रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम होण्याआधीच रत्नागिरी शहर पाेलिसांनी रोखला. हनुमान चालीसा पठणासाठी जमलेल्या मनसेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी सकाळी ही कारवाई केली.
शहरातील थिबा पॅलेस परिसरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात बुधवारी दुपारी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला हाेता. याची माहिती रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी यांना मिळताच ते कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. त्या पदाधिकाऱ्याच्या घराच्या परिसरात मुस्लिम बांधवांचे वास्तव्य असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पाेलिसांनी हनुमान चालीसाचा हा कार्यक्रम राेखला.
पाेलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रुपेश सावंत, अमाेल श्रीनाथ यांच्यासह ६ ते ७ जणांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे.