महाराष्ट्राचीही खराब सुऊवात; तीन बाद 48 : मनोज इंगळे, हंगरगेकर यांचा भेदक मारा
प्रतिनिधी / पुणे
मनोज इंगळे आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने दिल्लीचा पहिल्या दिवशी 191 धावांमध्ये खुर्दा उडविला. तर, महाराष्ट्राची सुऊवातही खराब झाली. महाराष्ट्राने 48 धावांमध्येच आपले तीन शिलेदार गमावले. महाराष्ट्र अद्याप दिल्लीपेक्षा 143 धावांनी पिछाडीवर आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ग्रुप बी मधील महाराष्ट्र आणि दिल्लीच्या सामन्याला सुऊवात झाली. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवून दिल्लीचा 191 धावांमध्ये खुर्दा उडविला.
दिल्लीने डावाची सुऊवात चांगली करताना शोरे आणि अनुज रावतने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, 54 धावा असताना अनुज रावत बाद झाला. त्याचा इंगळे त्रिफळाचित केले. 89 धावा असताना शोरेही बाद झाला. त्यानंतर 135 धावा असताना नितीश राणाही बाद झाला. यापोठापाठ यश धुलही फारकाळ तग धरू शकला नाही. त्याच धावसंख्येवर रावल बाद झाला. मिश्रा, समरजितसिंग, इशांत शर्मा आणि हिंम्मत सिंग बाद झाला आणि दिल्लीचा डाव 191 धावांमध्ये आटोपला. दिल्लीकडून हिंम्मत सिंगने सात चौकार आणि एका षटकारासह 49 धावा केल्या. शोरेने 41 धावांचे योगदान दिले. तर, यश धुलने 40 धावा केल्या. महाराष्ट्राकडून मनोज इंगळेने पाच बळी, राजवर्धन हंगरगेकर 3 बळी तर, आशय पालकरने दोन बळी घेतले.
महाराष्ट्राचीही सुऊवात चांगली झाली नाही. महाराष्ट्राने केवळ तीन धावा केल्या असताना पवन शहा बाद झाला. त्याला समरजित सिंगने बाद केले. यानंतर धावसंख्या 13 असताना कौशल तांबे शून्यावर बाद झाला. त्यालाही समरजित सिंगने बाद केले. यानंतर कर्णधार राहुल त्रिपाठीही केवळ एक धाव काढून बाद झाला. त्याला इंशात शर्माने बाद केले. आणि पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने 3 बाद 48 धावा केल्या. महाराष्ट्राने 48 धावांमध्येच आपले तीन शिलेदार गमावले. महारष्ट्र अद्याप दिल्लीपेक्षा 143 धावांनी पिछाडीवर आहे.