ऑनलाईन टीम/तरुण भारत
Maharashtra Political Crisis : शिंदे गटाला घटानापिठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थिगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे. तर आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या वतीने करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका फेटाळून लावली.