ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ओसरत आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विविध टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच गेल्या काही काळापासून सर्वसामन्यांसाठी ठप्प असणारी एसटीही पुन:श्च हरी ओम करत आहे. आजपासून एसटीची सेवाही सर्वसामान्यांसाठी पूर्ववत होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने ट्वीट करत माहिती दिली आहे.
एस.टी.चा पुन:श्च हरी ओम.. प्रवाशांच्या सेवेसाठी … चला करू प्रवास आपल्या लाडक्या एस.टी. संग….सुरक्षित आणि किफायतशीर…!(स्थानिक जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार) अशा आशयाचे ट्वीट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मास्क व निर्जंतुकीकरण याचे लोगे देखील दर्शवले आहेत.