ऑनलाईन टीम/तरुण भारत
“एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही, एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही, एका राज्यसभेने कोल्हापूर पोटनिवडणुक जिंकता येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही”, असं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यांनतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे धनंजय महाडिकांच्या विजयाने भाजप नेते मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करत आहेत. दरम्यान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.