ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले आहे. शुक्रवारी ५ वा पर्यंत बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला या पत्रातून आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात असताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghdi) आता राज्यपाल यांनी दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. राज्यपालांचा आदेश मान्य नाही अस महाविकास आघाडीने म्हटले आहे. राज्यपालांच्या आदेशाला कोर्टात आव्हान देण्याचे अधिकार आहेत का हे सुप्रीम पडताळून पाहिलं. ११ तारखेपर्यंत परिस्थिती आहे तशी राहिली पाहिजे, असं कोर्टाने निरिक्षण दिले होते, पण आता बहुमत चाचणी घेण्याचे पत्र राज्यपालांनी पाठवले आहे. महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सहजासहजी सरकार सोडणार नाहीत अस दिसत आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी थोड्यावेळात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या पत्राला आव्हान दिलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर यांनी काल राज्यपाल यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी अधिवेशन बोलावून शुक्रवारी ५ पर्यंत बुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.