कराड प्रतिनिधी
बांगला मुक्ती लढ्यासह अनेक युद्धामध्ये देशातील जवानांनी कष्ट घेतले. त्याग केला, शौर्य दाखवलं, त्यामध्ये महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पंचविसाव्या विजय दिवसाच्या मुख्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, अरुण जाधव, निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांची उपस्थिती होती.
सातारा जिल्हा देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरोधात संघर्ष करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, देशभक्त किसन वीर या सातारा जिल्ह्यातील सुपूत्रांनी मोठा त्याग केल्याचे शरद पवार म्हणाले.