अक्कलकोट प्रतिनिधी
“श्री श्रीशैल मल्लिकार्जुन की जय” च्या जयजयकाराने ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाची सांगता शनिवारी सायंकाळी सुर्यास्ताच्या सुमारास भव्य रथोत्सवाने झाली.
अक्कलकोट शहरात ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असून शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही याञा पाच दिवशीय याञेच्या मुख्य दिवशी शनिवारी रथोत्सवात विरशैव लिंगायत समाजांबरोबर इतर सर्व जाती- धर्मातील नागरिक-महिलां मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. यामुळे याञेमध्ये सर्वधर्म समभावासह भारतीय संस्कृतीचे दर्शन उपस्थितांनां झाले.
पहाटे पाच वाजता बसस्थानक समोरील देवस्थानात “श्री” ची महाअभिषेक व महापूजा माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी व अन्य मान्यवरांच्या हस्ते आणि वेदमुर्ती बसवराज शास्ञी यांच्या विविध मंञोपचाराने करण्यात आले.त्यानंतर कळसारोहण करण्यात आले.सकाळी १० वाजता शहराच्या प्रमुख मार्गावरुन पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आले. दिवसभर श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात शहर व तालुक्यातील हजारो भाविकांना खिरीचे महाप्रसाद वाटप करण्यात आले.
दुपारी ठिक एक वाजता नंदीध्वजाचे मानकरी अमोल पाटील, प्रा.विजयकुमार लिंबीतोटे, सुनिल नंदिकोले, नागराज रोडगे, स्वामीनाथ आडवितोटे यांच्या घरासमोर पाच ही मानाच्या नंदिध्वज काठ्यांची विधीवत पूजा करुन सवाद्य मिरवणुक मार्गस्थ झाले.नंदिध्वज घेणारे प्रमुख कार्यकते व पदाधिकारी – भक्तगण हे पांढरा शुभ्र बाराबंदी पोशाख परिधान केल्यामुळे उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.मिरवणुक मार्गावर सडासंनार्जन करून सप्तरंगी रांगोळी च्या पायघड्या घातले होते. बँन्जो, बँड पथक, ढोल ताशा व सनईचा मधुर आवाज, फटाक्याची आताषबाजी व श्री च्या जयजयकाराने सारे अक्कलकोट शहर व परिसर दुमदुमून गेले होते.
नंदिध्वजानां विविध रंगाच्या पताकासह नागफणी ने सुशोभित करण्यात आले होते.मिरवणुक मार्गावर स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछञ मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी नंदिध्वजचे विधीवत पूजा करुन दर्शन घेतले. तसेच ठिकठिकाणी महिलांनी नंदिध्वजाचे स्वागत पंचरत्न आरती ओवाळून करीत होते. नंदिध्वजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. हे पाचही नंदिध्वज देवस्थानला पाच प्रदक्षिणा घातल्या नंतर रथोत्सवास प्रारंभ करण्यात आले.
टोलेजंग रथोत्सवाला विविध रंगाच्या पुष्पहारनी सुशोभित करण्यात आले होते.सुर्योदयास मोठ्या जयजयकाराने सर्व भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केले. या रथावर प्रसाद’, खारीक, चुरमुरे, फळांचा वर्षाव केले.देवस्थान परिसरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आले होते. सुमारे २० ते २५ हजार भाविकांच्या साक्षीने हा मंगलमय सोहळा पार पडला.