नियम तोडणाऱयांना 500 रुपये दंड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख चढता पाहायला मिळत असल्यामुळे केजरीवाल सरकारने पुन्हा एकदा मास्कसक्ती केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीमध्ये प्रशासनाने पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱयांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱयांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी दिवसभरात 2,495 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 7 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 8,506 वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा दैनंदिन सकारात्मकता दर 15.41 टक्क्मयांवर पोहोचला आहे. अशातच, गेल्या 24 तासांत 1466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. देशात अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.