प्रतिनिधी /पणजी
मांडवी हॉटेलात काम करणाऱया सुमारे 200 कर्मचाऱयांनी आपल्या विविध मांगण्यासाठी काल शुक्रवारी येथली आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हॉटेल बंध असल्याने कर्मचाऱयांना काम नाही. तसेच कर्मचाऱयांनी सहा महिनन्याचा पगारही दिलेला नाही. अशास्थितीत कर्मचाऱयानी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यवस्थापनने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणमी कर्मचारी करीत आहेत.
गेली कित्येक वर्षापासून काम करणारे हॉटेल मांडवीचे कर्मचारी, अचानक हॉटेल बंद केल्यान रस्त्यावर आले आहेत. काहीजणांचे वयही उलटून गेल्याने त्यांना दुसरीकडे नोकरी मिळणे शक्य नाही अशा लोकांनी काय करावे असा प्रस्न त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी मांडवी हॉटेल कर्मचाऱयांनी पेली आहे. हॉटेल कंपनीने कर्मचाऱयांना पूर्णपणे फसविले असल्याचा आरोपही कर्मचाऱयांनी केला आहे. आम्हाला न्याय द्या अन्यथा परिस्थाती हाताबाहेर जाईल असा इशारा मांडवी हॉटेल कर्मचाऱयांनी दिले आहे,