आगामी लोकसभा निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांच्या घरासह २१ ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी चपेमारी केली. या छापेमारीनंतर आज मनीष सिसोदिया यांनी भाजपा तसेच मोदी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. यावेळी २०२४ ची लोकसभा निवडणूक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अशी लढवली जाईल, असेही मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन वादात सापडलेल्या दारू धोरणाचे देशातील सर्वोत्तम धोरण असल्याचे वर्णन केले. ज्या मद्य धोरणावरून हा वाद निर्माण होत आहे, तोच देशातील सर्वोत्तम धोरण आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे देशभरात नाव कमावत आहेत, त्यामुळे हे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते कट्टर प्रामाणिक आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य नीट करून दाखवले. तसेच एक-दोन दिवसात मला अटक होऊ शकते असेही ते यावेळी म्हणाले.
आज भारताचे नाव रोशन होत आहे, म्हणून केजरीवाल यांच्या आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांवर छापे टाकले जात आहेत. मी भ्रष्टाचार केला नाही, फक्त मी अरविंद केजरीवाल यांचा शिक्षणमंत्री आहे, असे ते म्हणाले. एक-दोन दिवसांत मला अटक करू शकतात. पंतप्रधानांना ते शोभत नाही. ते म्हणाले- अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक एवढाच आहे की केजरीवाल चांगल्या कामाची प्रशंसा करतात, त्यातून शिकतात आणि मोदीजींना चांगले काम थांबवायचे आहे, असं सिसोदिया म्हणाले.
हे ही वाचा : आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि… , फडणवीसांचा ठाकरेंना टोला
तसेच “या लोकांना भ्रष्टाचार आणि घोटाळे यांच्याशी काही देणेघेणे नाही. अरविंद केजरीवाल यांना जनतेकडून प्रेम मिळत आहे. त्यांचा जनाधार वाढत असून यांची त्यांना काळजी आहे. केजरीवाल हे देशपातळीवर मोदी यांना पर्याय ठरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोण पर्याय असेल असे जनतेकडून विचारले जात आहे. यावेळी मी जाहीर करतो की आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी असेल, ” असे मनीष सिसोदिया म्हणाले.
दिल्ली सरकारच्या दारू धोरणाची योग्य अंमलबजावणी झाली असती तर १० हजार कोटींचा फायदा झाला असता, असा दावा सिसोदिया यांनी केला. एवढा घोटाळा झाल्याचे मनोज तिवारी आणि एलजी वेगवेगळे आकडे सांगत होते, पण एफआयआरमध्ये ना ८ हजार कोटी, ना ११००कोटी, ना १४४ कोटींचा उल्लेख आहे. एवढेच सूत्रांचे म्हणणे आहे की १ कोटींचा घोटाळा झाला आहे.
सीबीआयच्या छाप्यावर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, काल सीबीआयचे अधिकारी माझ्या घरी आले, माझ्या सचिवालयातील कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. हे सर्व त्यांच्याकडून वरील आदेशाने केले जात आहे. मी सीबीआय अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो की, त्यांनी माझ्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली