टिळकवाडीतील सामर्थ्य मंदिरात तीन सत्रांमध्ये होणार संमेलन : डॉ. श्रुती वडगबाळकर संमेलनाध्यक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
मंथन कल्चरल अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी, हिंदवाडी महिला मंडळ यांच्या विद्यमाने 36 वे महिला साहित्य संमेलन रविवार दि. 29 रोजी टिळकवाडी येथील बुधवार पेठ, सामर्थ्य मंदिर येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सोलापूरच्या लेखिका डॉ. श्रुती वडगबाळकर उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात त्यांचे ‘मराठी साहित्यातील रत्नजडीत ओळी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या सत्रात व्यवसाय व स्त्राrशक्ती या विषयावर सीए पुष्कर ओगले यांचे व ‘कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण’ या विषयावर प्रा. प्रणव पित्रे यांचे व्याख्यान होणार आहे. तिसऱ्या सत्रात ‘काव्य मंथन’ होणार आहे.
पाहुण्यांचा परिचय
डॉ. श्रुती वडगबाळकर या सोलापूरच्या ए. आर. बुर्ला महाविद्यालयातून सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. ‘स्त्राr आत्मचरित्रांचा सामाजिक अंगाने अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएचडी प्राप्त केली. वसंत कानेटकर यांच्या ‘ऐतिहासिक नाटकातील नायक दर्शन’ या विषयावर त्यांनी एमफीलचा प्रबंध लिहिला आहे. देवलसी संत बहिणाबाई व महायोगीनी अक्कमहादेवी या त्यांच्या कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले आहेत. ‘सावलीतील बंद, अनुबंद व महाराष्ट्रातील स्त्राr विचारधारा’ हे त्यांचे संपादित ग्रंथ आहेत. त्यांच्या साहित्याला 35 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय समाज भूषण, जीवन गौरव, विडंबनश्री सावित्रीबाई फुले, शिक्षकरत्न, आदर्श शिक्षक असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
पुष्कर ओगले हे सीए असून काँकरंट ऑडिट ऑफ बँक्स आणि डायरेक्ट टॅक्स कमिटी हा कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. जीएसटीचा सर्टिफिकीट कोर्सही त्यांनी केला असून एसकेई सोसायटीचे सभासद आहेत.
प्रणव पित्रे हे एमएससी पदवीधर असून बेळगाव डिस्ट्रीक्ट, केमिस्ट्री टिचर्स फोरमचे पाच वर्ष अध्यक्षपद भूषविले आहे. ‘व्हिजन फॉर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतल्या आहेत. कर्नाटकातील मास्टर ट्रेनर ईन केमेस्ट्रीच्या प्रमुख 25 ट्रेर्नर्समध्ये त्यांचा समावेश आहे.
काव्य मंथन यामध्ये सहभागी पूजा भडांगे या मूळच्या बेळगावच्या असून ‘बिल्वपत्र’ हा पत्रकथा संग्रह ‘ऐहिकाच्या मृगजळात’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सीमावासियांची व्यथा व्यक्त करणारी त्यांची गझल डॉ. अमोल कोले यांनी ध्वनिमुद्रीत केली आहे. जनादेश गौरव पुरस्कार मिळाला आहे.
सुनीता रामचंद्र या निवेदक, कवयित्री, गझलकार, सायकलिस्ट म्हणून ओळखल्या जातात. ‘अनफॉलो अनफ्रेंड अन्ब्लॉक’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. संमेलन सर्वांसाठी खुले असून उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्षा शोभा लोकूर यांनी केले आहे.