वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये 14 ते 19 दरम्यान होणाऱया आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने निवड चाचणी स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे पण भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह अन्य काही बॅडमिंटनपटूंनी माघार घेतली आहे.
या निवड चाचणी स्पर्धेत भारताची माजी टॉप सिडेड सायना नेहवाल, आकर्षी काश्यप आणि मालविका बनसुद सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी आपण उपलब्ध राहू शकत नाही, असे सायना आणि मालविका यांनी बॅडमिंटन फेडरेशनला कळविले आहे. भारतीय बॅडमिंटन निवड समितीने पुरुष विभागात लक्ष सेन, एस. एस. प्रणॉय, तसेच पी. व्ही. सिंधू, सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांना त्यांच्या दर्जेदार विश्व मानांकनामुळे थेट प्रवेश देण्याचे ठरविले आहे. आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धा प्रत्येक दोन वर्षांनी भरविली जाते. 2021 ची ही स्पर्धा चीनमधील वुहान येथे घेण्याचे निश्चित केले होते पण कोरोना समस्येमुळे चीनमधील ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.