पक्षीप्रेमींच्या निरीक्षणादरम्यान स्पष्ट : खारफुटीची कत्तल, किनारी भागात वाढती मानवी वर्दळ, शेतात घुसलेले खारेपाणी, पठारी जमिनींच्या वापरातील बदल, यासारखी विविध कारणे
पणजी : वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवी घुसखोरी वाढल्याचा परिणाम म्हणून वन्यप्राण्यांनी आपले मोर्चे लोकवस्तींच्या दिशेने वळविल्याची अनेक उदाहरणे समोर असतानाच आता दरवर्षी गोव्याला भेट देणाऱ्या अनेक पर्यटक पक्ष्यांनी गोव्याकडे थेट पाठच केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत राज्यात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या बरीच खालावल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे पक्ष्यांची संख्या खालावण्यामागे अनेक कारणे असून त्यात खास करून खारफुटीचा नाश, पठारावरील जमिनीच्या वापरातील बदल आणि बंधाऱ्यांची दुऊस्ती न केल्याने खारे पाणी शेतात घुसणे, आदींचा प्रामुख्याने समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील काही प्रसिद्ध अशा किनारी भागात सतत वाढणारी मानवी वर्दळही या पक्ष्यांच्या मुळावर उठली असून, परिणामी त्यांनी स्वत:च किनारी भागात येणे थांबविले आहे. पक्ष्यांबद्दलच्या प्रेमापोटी रानावनाट भटकणाऱ्या उत्साही लोकांच्या यादीत गोव्याला सर्वाधिक पसंती आहे. राज्यात निवासी तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या एकुण 486 प्रजातींची नोंद आहे. परंतु ऑक्टोबर 2022 मध्ये जेव्हा पक्षी हंगाम सुरू झाला तेव्हा, गोव्यातील ओलसर प्रदेश आणि पठार भागात संख्या आणि प्रजाती या दोन्ही बाबतीत पक्ष्यांचे प्रमाण एकसारखे नसल्याचे पक्षी निरीक्षकांच्या लक्षात आले.
वरील भागात गतवर्षाच्या तुलनेत फारच कमी संख्येने पक्षी दिसून आले. उत्साही देतात. हल्लीच गोवा पक्षी संवर्धन नेटवर्क (सीबीसीएन) तर्फे भारतीय पक्षी रेसेसच्या समांतर तिसरी गोवा पक्षी शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनेक पक्षी निरीक्षकांनी राज्यात अनेक ठिकाणी सरावात भाग घेतला होता. त्यावेळी आणि पक्ष्यांना आश्चर्य वाटले ते म्हणजे राज्यातील अनेक पारंपारिक तसेच पक्षीनिरीक्षणासाठी प्रिय असलेल्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या रोडावली असल्याचे दिसून आले. या शर्यतीत सहभागीं विजेत्या आणि उपविजेत्या संघाने गोव्यात सापडणाऱ्या एकूण 486 पैकी 200 पेक्षा जास्त प्रजाती जिंकल्या. राज्यात खास करून करमळीसारख्या काही आद्र प्रदेशात तसेच सुकूर सारख्या पठारांवर पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, असे सीबीसीएन चे अध्यक्ष मंदार भगत यांनी सांगितले. गोव्यात येणारे प्रवासी पक्षी मुख्यत: उथळ पाण्याची ओलसर जमीन शोधतात. परंतु अनेक ठिकाणी शेती ओसाड ठेवण्यात आली असल्याने सदर पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ होते व पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण बनते.