रोहित उर्फ सागर पवार म्होरक्या : आरोग्य विभागात असल्याचे सांगून फसवणूक
प्रतिनिधी/सातारा
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीए, याप्रमाणे सध्याच्या दुनियेत फसणारे लगेच भेटतील पण फसवणूक करणाऱ्यांची शक्कल चालली पाहिजे. सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक पदावर म्हणून नोकरीला लावतो. म्हणून जिह्यातील अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, फसवणूक करणारी टोळी एवढी शातिर आहे की राजकीय पक्षाचा आधार घेत संबंधितांना फसवणूक झालेल्या युवकांनाच धमकी दिली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात प्रशिक्षक असल्याचे दाखवून विश्वास संपादन केला आहे. टोळीला सध्या पोलिसांच्या हातावर तुरी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
नोकरीला लावतो म्हणून फसवणूक करणाऱया टोळी अनेक ठिकाणी आहेत. जेव्हा फसवणूक होते तेव्हाच तक्रारदार पोलिसांपर्यंत जातो आणि मग प्रकरण उघडकीस येते. सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक आणि कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून नोकरी लावतो अशी बतावणी करुन तरुणांचा विश्वास संपादन करणाऱ्या एका टोळीने अनेक युवकांच्या खिसे रिकामे केल्याची धकादायक बाब उघडकीस आली आहे. या टोळीचा प्रमूख असलेला सागर उर्फ रोहित पवार हा मराठा महासंघाचा राज्य उपाध्यक्ष म्हणून सांगत होता. तसेच मनसेचा पदाधिकारी म्हणून सांगत होता. त्याचे वधूवर सुचक पेंद्र चालवले होते. त्यामुळे अनेक जण लग्न जमवायला त्याच्याकडे जात असताना नोकरीचा विषय काढायचे. तेव्हा तो नोकरी दीड ते दोन लाखात झेडपीत लावून देतो असे सांगून पैसे उकळू लागला. अनेक युवकांनी त्याच्याकडे कागदपत्रे दिली. काही युवकांनी त्याच्याकडे ऑनलाईन, चेकद्वारे पैसे दिले. जिल्हा परिषदेत ज्या युवकांकडून पैसे घेतले त्यांना काम झाले आहे हे दाखवण्यासाठी आरोग्य विभागातील प्रशिक्षक म्हणून गळयात ओळखपत्र घातलेल्या भामटा विक्रम चव्हाण या नावाने त्यांनी उभा केल्याचीही बाब समोर येत असून त्याच्या गुगल पे नंबरवरही पैसे घेतले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून या टोळीचा प्रमुख सागर उर्फ रोहित पवार हा कोरेगाव तालुक्यातील पिंपरीचा आहे. त्याच्यासोबत निहाल इनामदार, विक्रम चव्हाण व इतर साथीदार असून ही मुरलेली टोळी आहे. या टोळीने अनेकांना गंडा घातला असून झेडपीत सुध्दा याचा कोणालाही थांगपत्ता नाही.
पोलिसांकडे प्रकरण गेल्याने धमकीचे फोन
फसवणूक झालेल्या युवकांची मोठी रांग तयार होवू लागली आहे. सध्या अमोल घोलप 1 लाख 40 हजार, धनश्री घोलप 1 लाख 40 हजार, अमोल कुमावत 2 लाख, सुरेश यमगर याची 1 लाख, तौसिफ शेख 1 लाख 32 हजार, सम्राट नलवडे 2 लाख 50 हजार यांच्यासह अनेक युवक फसले आहेत.
टोळीच्या सुत्रधारासह टोळीतील सदस्य फरार होण्याची शक्यता
पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले असून अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसला तरीही कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होणार असून पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी टोळी सुत्रधार सागर पवार याच्यासह त्या टोळीतील सदस्यांनी जिह्यातुन फरार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सागर पवार याने तर फोन करुन तक्रार करणाऱया युवकांना धमकी दिली आहे.
पत्रकारांना ही मॅनेज आणि पोलीस काही करु शकत नाही
सागर पवार याने केलेल्या फोनवरुन संबंधित तक्रारदार युवकांना असे सांगितले की मी पत्रकारांनाही मॅनेज करतो. पोलीस सुद्धा माझे काही वाकडे करु शकत नाहीत. मी पोलीस बॉईंज संघटनेचा पदाधिकारी आहे, त्यामुळे संघटना ही फसवणूक करण्यासाठी आहे काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
वधुवर पहायला गेलेलेही फसल्याची शक्यता
सागर पवार याचे वधूवर सुचक केंद्र असल्याचे समजते. त्याने अनेकांना वधूचे चांगले स्थळ दाखवून देतो म्हणून ही फसवणूक केल्याच्या घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच काही वरांचे स्थळ दाखवण्यासाठी वधूंच्या पित्याकडूनही पैसे उकळले गेले असावेत, अशीही चर्चा रंगत आहे.