शिरोळ/प्रतिनिधी
मुसळधार पावसाने शिरोळ तालुक्यातील अनेक गावचा संपर्क तुटला आहे. काही भागात पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. शिरोळ ते नांदणी शिरोळ जुना कुरुंदवाड रस्ता, कनवाड-म्हैसाळ-शिरोळ बंधारा, तेरवाड बंधारा, राजापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दोन दिवस झाले वाऱ्याने तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे नागरिकात भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील 54 पैकी 40 गावांना महापुराचा फटका बसत असल्याने महापुराची धास्ती निर्माण झाले आहे. तर घाट माथ्यावर सुरू असलेल्या पावसाने व राधानगरी वारण, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने कृष्णा,. पंचगंगा, वारणा व दूधगंगा नदीचे पाणी पात्र बाहेर पडले आहे. पुरामुळे शेतातील हाता तोंडाला आलेली पिके कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर वादळी वाऱ्याने ऊस भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यां शेतकरी चिंतेत आहे.