828 पैकी 550 प्रकल्प पूर्ण : स्मार्ट सिटीच्या प्रमुखांना सूचना : 15 प्रकल्पांसदर्भातील निविदा दुसऱया टप्प्यात
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर बरीच कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सध्या 71 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत तर 141 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 1347.2 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. 2504.6 कोटी रुपयांचे कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राकेशसिंग यांनी दिली.
केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत सर्व स्मार्ट सिटीच्या प्रमुखांना सूचना करण्यात आली आहे. अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. बेळगाव शहराबरोबरच कर्नाटकातील ज्या शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे त्या शहरांचीदेखील माहिती दिली आहे.
कर्नाटकातील 7 स्मार्ट सिटीमधील 825 प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 66 टक्क्मयांपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत. इतर 262 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. विभागाच्या आकडेवारीनुसार 17533.5 कोटी रुपयांच्या 828 प्रकल्पांपैकी 5263.6 कोटी रुपयांचे 550 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या 262 प्रकल्पांची किंमत 10799.8 कोटी रुपये असल्याचेही शहर विकासमंत्री भहिरथी बसवराज यांनी ही माहिती दिली.
सध्या काही प्रकल्पांचे काम शिल्लक आहे. 70 टक्क्मयांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. तर 15 प्रकल्पांसदर्भात निविदा काढण्यात आल्या आहेत. त्या दुसऱया टप्प्यात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एकूणच आम्ही स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या कामामध्ये प्रगती केली आहे. केंद्र सरकारने शेवटच्या टप्प्यात बेंगळूर शहरासह इतर ठिकाणी अतिरिक्त कामे दिली आहेत. तीही लवकर पूर्ण होतील, अशी आम्हाला खात्री आहे. तुमकूर, बेंगळूर येथेदेखील काम प्रगतीपथावर असल्याचेही
शहर विकासमंत्री भहिरथी बसवराज म्हणाले.
देशपातळीवरील स्मार्ट सिटीची कामे
25 जून 2015 रोजी केंद्र सरकारने स्मार्ट मिशनचा शुभारंभ केला. 2016 जानेवारी ते 2018 दरम्यान चार फेऱयांमध्ये 100 शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली होती. मार्च 2022 पर्यंत 100 स्मार्ट सिटींनी 1.9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची 6 हजार 928 प्रकल्पांच्या निविदा काढल्या होत्या. 59958 कोटी रुपये किमतीचे 3576 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
5 वर्षांत 48 हजार कोटींचे आर्थिक साहाय्य प्रदान करेल
केंद्र सरकार मार्गदर्शक तत्त्वानुसार 5 वर्षांत 48 हजार कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य प्रदान करेल. सर्व राज्य सरकारेही त्यामध्ये योगदान देतील, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने 100 स्मार्ट सिटींसाठी 29213.6 कोटी रुपये दिले होते. त्यापैकी 25177.6 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राकेशसिंग यांनी सांगितले आहे.