मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्याचं शिष्ठमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील हे राजभवावर दाखल झाले आहेत. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही राजभवनावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देणार आहेत. यानंतर पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत.
राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.