प्रतिनिधी /पणजी
मराठवाडा साहित्य परिषदेने ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्तरावरील मराठी कवयित्री संमेलनाचे आयोजन उस्मानाबाद येथे केले असून या कवी संमेलनात गोव्याती कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांचा समावेश केला आहे.
देशातील नामवंत 15 कवयित्रींचा या संमेलनात समावेश केलेला असून त्यात अंजली कुलकर्णी व अनुजा जोशी या गोमंतकीय कवयित्रींचा समावेश केलेला आहे. हे संमेलन दि. 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. प्रा. कौतिकराज ठाले पाटील मसाप अध्यक्ष हे उद्घाटक असतील तर संजीवनी तडेगावकर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.