प्रतिनिधी/ बेळगाव
गोंधळी समाजाच्यावतीने सुभाषनगर येथे श्री मरगाई देवीची जत्रा भक्तिभावाने व श्रद्धेने पार पडली. गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.
यावेळी देवीची विशेष आरास करून सुवासिनींच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. देवीची मुख्य पूजा झाल्यानंतर नैवेद्य झाला. संबळ, तुणतुणे या वाद्यांसह गेंधळींनी उत्साहाने मिरवणूक काढून मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरण्यात आली. दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये ही जत्रा आयोजित केली जाते.
या प्रसंगी गोंधळी समाजातील सर्व सदस्य उपस्थित होते. जत्रा यशस्वी करण्यासाठी गोंधळी समाजाचे अध्यक्ष कृष्णा माने, उपाध्यक्ष लक्ष्मण भिसे, गेंधळी समाज कार्यवाह गोपाळ भिसे, बसवराज माने, तुकाराम मुतोडकर, पंडित भिसे, महिला मंडळ अध्यक्षा नितू भिसे, उपाध्यक्षा माधुरी रांगणेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.