बेळगाव / प्रतिनिधी
मध्यमवर्गीय कुटुंबांना बचतीची सवय लावून त्यांच्या भविष्यातील ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याच्या कामी हैदराबादस्थित मार्गदर्शी चिटफंड यशस्वी ठरले आहे. सर्वोत्तम कार्यप्रणाली, ग्राहक प्रथम धोरण आणि समर्पित कर्मचारीवर्गाच्या जोरावर कंपनीने 60 वर्षे पूर्ण केली असून, याची यशोगाथा सर्वत्र चर्चिली जात आहे.
60 वर्षांपूर्वी रामोजीराव यांनी मार्गदर्शी चिटफंडच्या लावलेल्या रोपटय़ाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येक घराघरात मार्गदर्शी चिटफंडचे नाव झाले आहे. हैदराबादच्या हिमायतनगर येथे अवघ्या दोन कर्मचाऱयांद्वारे सुरू झालेली ही संस्था आता 108 शाखा आणि 4 हजार 300 कर्मचाऱयांच्या माध्यमातून जनतेला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याच्या ध्येयाने वाटचाल करीत आहे. संस्थेकडे 60 लाख वर्गणीदार ग्राहक असून, वर्षागणिक प्रगतिपथावर घोडदौड करीत आहे.
रामोजी ग्रुपशी संलग्न असलेल्या मार्गदर्शी चिटफंडच्या प्रमुख म्हणून शैलजा किरण या काम पहात आहेत. त्यांच्या अतुलनिय नेतृत्वाखाली संस्थेने वित्तीय शिस्त, व्यावसायिक प्रामाणिकपणा, मूल्ये, विश्वास यांच्या जोरावर उच्चदर्जाची व्यावसायिक प्रगती केली आहे. मार्गदर्शी चिट्सचे वर्गणीदार असलेले पगारदार, नोकर, लहान आणि मध्यम व्यावसायिक, मोठय़ा उद्योगधंद्यांचे मालक या सर्वांनाच लाभ झाला आहे. बचतीचा एक लोकप्रिय पर्याय म्हणून मार्गदर्शी चिटफंडकडे मोठय़ा विश्वासाने पाहिले जाते, असे शैलजा सांगतात.