उमेदवारी अर्ज न भरणाच्या सर्व पक्षाचा व गटाचा निर्णय, राधानगरी शहरात 100 टक्के बंद यशस्वी
राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी नगरपंचायत मागणीसाठी सर्व पक्षीय नागरीकांनी आज राधानगरी शहर बंद ठेवण्यात आले. रॅली काढून मतदार जनजागृती करत ग्रामस्थांच्या बैठकीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्धार करण्यात आला. या संदर्भात राधानगरीला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी तहसीलदार मीना निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
राधानगरी शहरातील व्यापारी संघटनांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला.जनजागृतीसाठी काढलेल्या रॅलीत प्रमुख नेत्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी राधानगरी नगरपंचायत झालीच पाहिजेच्या घोषणा देण्यात आल्या.
मतदारजनजागृती सभेत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही निवडणूक अर्ज भरायचा नाही असे ठरवण्यात आले. संपूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी अभिजित तायशेटे यांनी नगरपंचायत झाल्यास विकासात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अनिल बडदारे, राजेंद्र चव्हाण, सुधाकर साळोखे, रमेश बचाटे, दीपक शेट्टी, संभाजी आरडे, सुहास निंबाळकर, सतीश फणसे, दत्तात्रय निल्ले, स्वप्नील साळोखे आदींनी आपल्या मनोगतातून राधानगरी नगरपंचायत होण्याचे महत्व स्पष्ट केले.ठ
यावेळी दीपक शिरगावकर,उत्तम पाटील, ऍड,अभिजित हुपरिकर, दादासो सांगावकर,विजय महाडीक, तानाजी चौगले, महादेव पाटील, मारुती टिपूगडे, उत्तम पाटील, अनिल तायशेटे, अनिल पताडे, मंगेश चौगले यांच्यासह सर्व पक्षाचे नेते,गट प्रमुख ,विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारीआणि कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते