प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या कवयित्री मीरा यांच्या ‘रेशीमबंध ः आवर्तन’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचे प्रकाशन दि. 21 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जीएसएस कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, प्रमुख वक्ते म्हणून कोकणी भाषा निमंत्रक भूषण भावे व अध्यक्ष म्हणून ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी रेशीमबंध स्नेही गोविंद काळे, अरुणा सबाने, अनिल मेहता, संपदा कुंक्कळकर, रूपा कुलकर्णी, यशोदा काटकर यांचा सत्कार होणार आहे.
ऍड. रमाकांत खलप
केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले रमाकांत खलप यांनी गोव्याच्या राजकारणात आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. त्यांचा मूळचा पिंड सामाजिक, साहित्य आणि कलाक्षेत्रात रमण्याचा आहे. ते स्वतः लेखक असून त्यांनी अनेक पुस्तकांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.
भूषण भावे
यांचे मराठी, हिंदी, कोकणी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आहे. ते विद्या प्रबोधिनी कॉमर्स कॉलेज येथे प्राचार्य म्हणून काम पाहतात. केंद्रीय साहित्य अकादमी कोकणी भाषेच्या सल्लागार समितीचे ते निमंत्रक आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’ पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे.
अरुणा सबाने
या मूळच्या लातूरच्या असून सामाजिक कार्याशी निगडीत आहेत. स्त्री प्रश्नांसाठी त्या अनेक वर्षे कार्य करत आहेत. उत्तम लेखिका असून त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘सूर्य गिळणारी मी’ हे त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.