नवी दिल्ली
वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपन्यांपैकी एक असणारी एमजी मोटर इंडिया ही भारतामधील दुसऱया प्रकल्पासाठी जवळपास 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सदरच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी गुजरातसह अन्य काही राज्यांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. आम्ही भारतामध्ये कंपनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तसेच दुसऱया प्रकल्पाचीही सुरुवात करण्यासाठी गुंतवणूक वापरणार आहोत, असे कंपनीचे अध्यक्ष राजीव छाबा यांनी यावेळी सांगितले आहे. गुजरात येथे असणाऱया प्रकल्पाची सध्याची क्षमता ही आगामी वर्षापर्यंत 1.25 लाख वाहन निर्मितीपर्यंत पोहोचणार असल्याचे संकेत यावेळी व्यक्त केले आहेत. मात्र आणखीन वेगाने उत्पादन वाढविण्यासाठी आम्हाला दुसऱया एका प्रकल्पाची आवश्यकता भासणार असल्याचेही या दरम्यान कंपनीने स्पष्ट केले आहे.