किसान सन्मान निधी उद्या थेट बँक खात्यात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो शेतकऱयांना दिवाळीपूर्वी मोठी भेट देणार आहेत. सोमवार, 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी ‘किसान सन्मान निधी’ योजनेचा 12 वा हप्ता जारी करतील. प्रशासकीय पातळीवरील पडताळणीनंतर जे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. उर्वरित शेतकऱयांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात एक बटण दाबून ही करोडो रुपयांची रक्कम पात्र शेतकऱयांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये पोहोचतील. यावेळी सरकारने योजनेच्या 12 व्या हप्त्याची रक्कम जारी करण्यापूर्वी स्थिती तपासण्यासाठी नियम बदलला आहे. किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता सप्टेंबरमध्येच जारी होणार होता. मात्र पात्र शेतकऱयांची पडताळणी आणि ई-केवायसी यामुळे विलंब झाला. शेतकऱयांना आर्थिक मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एका वर्षात 6 हजार रुपये दिले जातात. 2 हजार रुपये प्रमाणे तीनवेळा ही रक्कम दिली जाते.
अपात्र शेतकरी निधीपासून वंचित
आता सरकारने या योजनेतून अपात्र ठरलेल्या शेतकऱयांना काढून टाकले आहे. आता या शेतकऱयांना ही रक्कम मिळणार नाही. देशातील सर्वात मोठय़ा उत्तर प्रदेश राज्यातील 21 लाख शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती असून अपात्र शेतकऱयांच्या खात्यात रक्कम येणार नाही. अपात्र शेतकऱयांना नोटिसा पाठवून आधीच पाठवलेली रक्कमही परत मागितली जात आहे. पडताळणीनंतर सरकारने पीएम किसान पोर्टलवर पात्र आढळलेल्या सर्व शेतकऱयांचे तपशील अपलोड केले आहेत.
मोबाईल क्रमांकावरून स्टेटस तपास शक्य
या योजनेत पूर्वी लाभार्थी शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्यांच्या मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्डद्वारे स्थिती तपासू शकत होते. आता पुन्हा एकदा नियमात बदल करण्यात आला असून केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच लाभार्थी शेतकऱयांना त्यांची स्थिती पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता आधारद्वारे स्टेटस पाहणे शक्मय होणार नाही.