ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जातोय. तसेच राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी उद्धव टाकरे गट तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून केली जात आहे. दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. तसंच त्यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचाही उल्लेख केला आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर काँग्रेसने या दोघांनी आणि भाजपने महाराष्ट्राची माफी न मागितल्यास तुम्हाला फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून संताप व्यक्त केला जात असताना, भाजपाचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही. बाळासाहेब ठाकरे यांना काही लोक प्रतिशिवाजी म्हणायचे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे प्रतिशिवाजी होते का? याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. शरद पवार यांना जानता राजा म्हणायचे. आपण उदाहरण देताना प्रतिकात्मकता म्हणून ते वापरतो. दोन भावांमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण आहेत, असे म्हणतो,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हे ही वाचा : बस झालं! आता बोचकं गुंडाळ, कोश्यारींच्या वक्तव्याविरोधात आव्हाड आक्रमक
भाजप प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दात समाचार घेतला. त्यांनी म्हटलं की, भाजपची ही अधिकृत भूमिका आहे का? शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी कधी मागितली हे आज मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर करावे. मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोक निषेधही करू शकले नाहीत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हणण्यात आलंय. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकत आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.