लखनौ
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱयांना वाहनाखाली चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर खटला चालणार आहे. या खटल्यातून आशिष मिश्राचे नाव वगळण्याचे अपील न्यायालयाने सोमवारी फेटाळले. याप्रकरणी मंगळवारी आरोप निश्चित केले जातील, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाच्या या पवित्र्यामुळे आशिष मिश्रासह अजय मिश्रा यांची डोकेदुखी वाढली आहे. यावषी फेब्रुवारी महिन्यात लखीमपूर खेरीमध्ये निर्माण झालेल्या आंदोलन-तणावाच्या घटनेदरम्यान 4 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.