Sharad Pawar News : गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहे. यामुळे अनेक मोठ्या नेत्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच भाजप सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनीही भाष्य केलं आहे. भाजपाने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. विरोधकांनी आता एकजूट झाले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी आगामी निवडणूकी संदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आगामी 2024 मधील लोकसभा निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो असे संकेत त्यांनी दिले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्येही सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आपल्याला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे असंही ते म्हणालेत.
नितीश आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी योग्य राजकीय निर्णय घेतला. भाजपसोबतची युती सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच कौतुक पवार यांनी केलं. त्यामुळे पुढील निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवली जाण्याची शक्यता आता बळावली आहे.
Previous Articleझाराप पत्रादेवी बायपासवर कार पलटी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.