ऑनलाईन टीम / मुंबई :
कोर्टाने राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे सांगितलं आहे. तरीही शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) त्यावर आक्षेप घेतात. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप माणूस आहे. राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात. आम्हाला 20 फूट खोल गाडण्याची धमकी देतात. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पण हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका आमदार रवी राणा (ravi rana) यांनी केली.
रवी राणा म्हणाले, ठाकरे सरकार आमच्यावर सुडापोटी कारवाई करत आहे. अहंकारने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारचा अहंकार असेल तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. कोर्टाने हा गुन्हा चुकीचा असल्याचे सांगितलं आहे. तरीही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहे.
सत्तेचा दुरुपयोग करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही दिल्लीत करणार आहोत. संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, त्यांना ही आम्ही तुरुंगात टाकू, असा इशाराही रवी राणा यांनी दिला आहे.