प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्या समर्थक सेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आह़े. शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख महेश उर्प बाबू म्हापना, महिला संघटक कांचन नागवेकर यांना पदावरून हटवण्यात आले आह़े. आठ दिवसांपूर्वी युवा सेनेतील सामंत समर्थक पदाधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आले होत़े. त्यामुळे सामंत समर्थकांना स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचे दिसून येत आह़े.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेकडून नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे जाहीर करण्यात आले आह़े. त्यानुसार रत्नागिरी शहर प्रमुख म्हणून प्रशांत साळुंखे, उपजिल्हापमुख म्हणून प्रकाश रसाळ, महिला संघटक म्हणून साक्षी रावणांग यांची नियुक्ती करण्यात आली आह़े. मात्र नियुक्तीच्या काही तासातच उपजिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजिनामा देत असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात त्यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके व रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्याकडे आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे.