सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार
प्रतिनिधी /बेळगाव
आदर्शनगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी उद्यानानजीक मंगळवारी भटक्मया कुत्र्यांनी वानरावर जोरदार हल्ला चढविला. वानराचे लचके तोडल्याने ते मृत्युमुखी पडले. यामुळे शहरातील कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. जनावरांप्रमाणेच मनुष्यांवरही भटक्मया कुत्र्यांचे हल्ले सुरू असून महानगरपालिकेने भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
भटक्मया कुत्र्यांनी मागील काही दिवसात शहरातील विविध भागात उच्छाद मांडला आहे. महानगरपालिकेकडून काही कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचे दाखवून डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु भटक्मया कुत्र्यांचा उच्छाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. मध्यंतरी काकतीवेस परिसरात लहान मुलीवर भटक्मया कुत्र्यांनी हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्यावेळी आपण कुत्र्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन खुद्द आरोग्य अधिकाऱयांनी दिले होते. परंतु पुढील काळात यावर कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे दिसून आले.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंत्यसंस्कार
मृत वानरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि स्वच्छता विभागाचे निरीक्षक संजय पाटील व राजेश गोल्लद यांनी पुढाकार घेतला. शहापूर येथील स्मशानभूमी नजीकच्या गायरानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक रविंद्र जाधव, मायक्रो इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष रमेश देसुरकर, मोहन पाटील, सूरज कांबळे, रमेश कोलकार, उळवाप्पा कोलकार, फकिराप्पा भोमण्णावर, राकेश कांबळे यांच्यासह इतर तरुणांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला.