ऑनलाईन टीम/तरुण भारत
अनेक दिवस उसंत घेतल्यानंतर पावसाने (Rain) पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे आणि ५ दिवस मान्सून (Monsoon) सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याची पातळी गाठू शकतात.
दरम्यान, पावसाने पुन्हा राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल. तर काही भागांमध्ये मध्यम ते सौम्य पाऊस पडेल. तसेच ५ दिवस पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यताही वर्तविली आहे.
हे ही वाचा : शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट वेगळा; एकनाथ शिंदेंचं ट्विट चर्चेत
दरम्यान, हवामान विभागाने सध्या राज्यातील पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.