शनिवारी मुंबईत दुचाकी सरकण्या इतपत म्हणजे रस्ता भिजण्याइतपत पाऊस झाला. मात्र तो नोंद घेण्याएवढाही नक्की नव्हता. याला वळवाचा पाऊस म्हणावा तर त्याही व्याख्येत न बसणारा होता. मागील आठवडय़ात राज्यभर झालेला पाऊस हा वळवाचा होता. मात्र यावरुन मान्सून प्रवास मंदावला असेही म्हणणे चुकीचे ठरेल असे हवामान तज्ञच सांगत आहेत…
जून महिना जवळ येऊ लागल्यावर मान्सून किंवा वळवाच्या पावसाची सर्वांनाच ओढ लागते. त्यातूनच राज्यात सुरु असलेल्या पाऊस सरीसोबत मुख्य मान्सूनचे अडाखे लावले जात आहेत. शिवाय यात वळवाचा की मान्सून दाखल होण्याचा अंदाजही केला जात आहे. मात्र अंदमानात दाखल झालेला मान्सून हव्या त्या वेगाने पुढे येत नसल्याने मान्सून मंदावला असाही अंदाज लावण्यात येत आहे. याला मात्र नाही असे उत्तर मिळत आहे. मागील आठवडय़ात राज्यात पावसाने थोडी फार हजेरी लावली. तर मुंबईत शनिवारी रात्री काही भागात पावसाचा शिडकाव झाला. परळ, सायन, माटुंगा, कुलाबा, गोरेगाव, कुर्ला सारख्या परिसरात किरकोळ सरी झाल्या. हवामान तज्ञांच्या मते या स्थितीला स्थानिक हवामान स्थिती (आयसोलेटेड लोकलाईज्ड फिनॉमिनॉ) म्हणतात. मात्र सध्या बदलणाऱया स्थितीतून मान्सून मंदावला आहे असे म्हणू शकत नाही. जोपर्यंत मान्सून केरळला धडकत नाही तोपर्यंत मान्सून सुरु झाला असे म्हणू शकत नाही. तत्पूर्वी होणाऱया पावसाला पूर्व मान्सून किंवा वळवाचा पाऊस म्हटले जाते. 1 जून हीच मान्सून केरळला पोहोचण्याची सर्वसाधारण तारीख असते. भारतीय हवामान शास्त्र विभागाने यापूर्वीच 27 मे रोजी मान्सून केरळला येणार असल्याचे जाहीर सांगितले आहे. यात उणे अधिक चार ते पाच दिवस होऊ शकतात. मान्सूनला पोषक वातावरणच निर्माण होत नसल्याने यात दिवस उणे कधी होत नसतात. अशावेळी हवामान विभागाच्या मान्सून अंदाजात सांगितल्याप्रमाणे चार दिवस अधिक धरल्यास केरळला मान्सून धडकण्याची तारीख 1 ते 3 जून अशीच तारीख येत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडे यापूर्वीच्या उपलब्ध माहितीनुसार यात अंदाजाने 1 जून हीच तारीख सांगण्यात येते. शिवाय तत्कालीन हवामान स्थितीचा देखील मान्सूनच्या आगमनावर परिणाम होत असतो. सद्यस्थितीकडे पाहिल्यास मान्सून प्रवास मंदावला असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर 28 मेपर्यंत सुद्धा मान्सून केरळच्या परिसरातही दाखल झाला नाही तर मान्सून मंदावला असे म्हणणे योग्य ठरेल असे हवामान अभ्यासक श्ंातनु पाटील यांनी मत मांडले. सौदीकडून येणाऱया गरम हवेचा प्रवाह उष्ण वारा आत घेऊन येत आहे. हा वारा दक्षिणेकडे वाहत असल्याने महाराष्ट्रावर सध्या ढगाळ वातावरण येत आहे. यात हवेत बाष्पच आढळत नसल्याचे हवामान अभ्यासक शंतनु पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान कर्नाटकाच्या दिशेने हवेत बाष्प आढळून येत असले तरी महाराष्ट्रावर मात्र कोरडे ढग आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता दिसून येत नाही. तसेच पूर्व मान्सून किंवा मान्सूनसाठी पोषक स्थिती नाही. प्रचंड उष्णता, समुद्राकडून येणाऱया हवेत बाष्प असल्यास मान्सून पूर्व वळवाचा पाऊस येतो, अशी स्थिती दोन चार †िदवसांपूर्वी राज्यात होती. आता मात्र तसेही दिसून येत नसल्याचे अभ्यासक मत मांडतात. सध्या फक्त कोरडी हवा असून बाष्पाचा मागमूस आढळून येत नाही. त्यामुळे वळवाचा पाऊस देखील नसणार या अंदाजाला दुजोरा मिळत आहे.
दरम्यान दरवर्षी केरळात 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा 27 मे रोजी दाखल होण्याची वातावरणीय चिन्ह दिसून येत असल्याचे सांगत भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून सहा दिवस आधीच दाखल होत असल्याचे सांगितले. मात्र हे सांगताना मान्सून मॉडेलच्या चार दिवसांच्या कमी अधिक त्रुटीसह दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली. हे वाक्य मान्सून अंदाजात सद्यस्थितीला लागू होत आहे. शिवाय त्यावेळची मान्सून पोषक वातावरणीय स्थिती कायम राहिल्यास तसेच कोणताही अडथळा न रा†िहल्यास राज्यातही वेळेत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर सद्यस्थितीत अंदमान पर्यंतचा मान्सूनचा प्रवास सुसाट होता. दरम्यान केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येईपर्यंत मान्सून पुरक वातावरणीय स्थिती राहिल्यास सात †िदवसांत मान्सून राज्यात दाखल होतो. भारतीय उपखंडात दक्षिण अंदमानातून मान्सूनला सुरुवात होते. त्यानंतर मान्सूनचे वारे बंगालच्या उपसागरातून उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकतात. मान्सूनच्या दरवर्षी होणाऱया वाटचालींनुसार मान्सून 22 मेच्या सुमारास अंदमानात सरकतो. मात्र विषुयवृत्तीrय वाऱयाची सद्यqिस्थती पाहिल्यास मान्सून अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात 15 मेच्या सुमारास पुढील वाटचालीसाठी सज्ज झाल्याची चिन्ह आढळून आले असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी त्यावेळी सांगितली होती. गेल्या 17 वर्षाच्या पावसाच्या अंदाजावरुन केरळमधील मान्सून आगमनाचे अंदाज वर्तविण्यात येतो. दरम्यान मागच्या आठवडय़ात राज्यात किरकोळ ठिकाणी पडलेल्या पावसाला पूर्व मान्सून किंवा वळवाचा असे ही म्हणू शकत नाही असे आता हवामान तज्ञ सांगत आहेत. हा पाऊस म्हणजे स्थानिक हवामान स्थितीचा प†िरणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. एखादा ढग जमिनीपासून कमी अंतरावर असतो तो बरसतो आणि निघून जातो. हा पाऊस जाणवत देखील नाही. यालाच ‘आयसोलेटेड लोकलाईज्ड फिनॉमिनॉ’ असे म्हणत असल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत. दरम्यान मुख्य मान्सून आणि वळवाचा पावसाची स्थिती वेगळी असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवडय़ात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस हा स्थानिक भागात झालेला आढळून येतो. त्याचवेळी किरकोळ ठिकाणी गडगडाट आणि जादा गतीचा वारा देखील दिसून आले. शिवाय ढगांनी मर्यादित स्वरुपात आकाश आच्छादलेले यात दिसून आले. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाचे चार प्रमुख माहिने आहेत. हवामान विभागाने मोसमी पाऊस केरळमध्ये 27 मे रोजी दाखल झाल्यास शिवाय तत्कालीन पोषक स्थिती निर्माण झाल्यास राज्यात मान्सून वेळेत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.