सप्टेंबर अखेरपर्यंत पडणारा मुसळधार पाऊस परतीचा पाऊस लांबणार असे होत नसून पाऊस सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने आधीच स्पष्ट केले होते. त्याचवेळी मान्सून ट्रेंड बदलतोय असाही अंदाज करणे चुकीचे असून तसे असल्यास जागतिक हवामानशास्त्र विभागासह भारतीय हवामान शास्त्र विभागानेदेखील तसा इशारा दिला असता. तात्पर्य सध्या होण़ाऱया मुसळधार पावसाकडे भारतीय हवामान शास्त्र विभागाने वेळोवेळी दिलेल्या अंदाजाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मान्सून साक्षर झाल्यास पावसावरून होणारी स्वरचित अंदाजांची चूक स्वयंघोषित हवामानशास्त्रज्ञांकडून भविष्यात होणार नाही.
2022 या वर्षातील मान्सून सरासरीपेक्षा अधिक होणार आहे. याला कारण म्हणजे सलग तिसऱया वर्षी मान्सूनवर ला निनाचा प्रभाव आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यात अधिक होणार असल्याचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यापूर्वीच करण्यात आला होता. शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी पावसाने मुंबईत कहर केला. या एकाच दिवशी मोसमातील सर्वाधिक पाऊस झाला. यात प्रामुख्याने शहर, पूर्व तसेच पश्चिम उपनगरांसह संपूर्ण मुंबई मेट्रो पॉलिटन प्रदेश होता. सिंधुदुर्ग ते पालघर परिसरदेखील या पावसाने अक्षरशः धुवून काढला. अद्याप त्या वातावरणीय स्थितीचा परिणाम मुंबईसह ठाणे पालघर जिह्यात दिसून येत आहे. मुसळधार सरी, सोसाटय़ाचा वारा, विजा आणि गडगडाट असे स्वरूप सध्या होणाऱया पावसाचे आहे. राज्यातही तीच स्थिती आहे. हा लेख लिहीत असताना धुळे जिह्यात अतीमुसळधार पाऊस होत असल्याचे समजत आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ापर्यंत ऑगस्ट महिन्यासारखा पाऊस होणे म्हणजे पाऊस मुक्कामी आहे किंवा पाऊस उशिरा परतणार तसेच मान्सून ट्रेंड बदलण्याचा अंदाज स्वयंघोषित हवामान शास्त्राr
लावत आहेत. मात्र हा अंदाज शेकडो निरीक्षणे नोंदविणारे भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ अभ्यासातून हा अंदाज खोडून काढत आहेत. नागरिकांना भारतीय हवामान साक्षर करण्याची त्यांची पद्धत काहीशी सौम्य असली तरी सोशल माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
तर मुख्य विषय म्हणजे शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. यातून मुंबईच्या कमाल तापमानात तीन अंशाने घट नोंदवली गेली. तर मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमान तब्बल पाच अंशाने खाली घसरले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील मुंबईतील सप्टेंबर महिन्यातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तसेच मुंबईतील काही ठिकाणी पावसाची नोंद 90 ‘मिमी’ला स्पर्शणारी देखील होती. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळी महिने असून त्यात सप्टेंबर महिना हा पावसाळ्याचा शेवटचा महिना मानला जातो. कारण या महिन्यात पावसाचा जोर कमी होताना दिसून येतो. या पारंपारिक मान्सून परतीच्या निकषाला यंदाचा पावसाळा अपवाद ठरत आहे. मात्र यापूर्वी सप्टेंबर महिन्यात पाऊस सक्रिय असलेली उदाहरणे हवामान शास्त्रज्ञ देतात. दरम्यान मान्सून नवा ट्रेंड स्थापित करतोय या मुद्यालाच भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे खोडून काढतात. मान्सून सप्टेंबरपर्यंत माघार घेतो. तसेच मान्सूनने काही वेळा ऑक्टोबर महिन्यातही माघार घेतलेली आहे. मागच्या वेळी 23 ऑक्टोबर रोजी मान्सूनने माघार घेतली. तर 2015 या वर्षात 4 सप्टेंबर रोजी माघार घेतलेली आहे. त्यामुळे देशातून मान्सून परतीची सरासरी तारीख ही 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत केव्हाही असते. मात्र गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत राजस्थानातून मान्सून परतीची तारीख 1 सप्टेंबरपासून 25 सप्टेंबरपर्यंतची असून संपूर्ण देशातून निघून जाण्याची तारीख 1 ते 25 ऑक्टोबरपर्यंत घेत असल्याचे दिसून आले आहे. ही तारीख त्या त्या वर्षी वातावरणीय स्थितीसह निर्माण होणाऱया प्रणालांवर अवलंबून आहे.
शुक्रवारच्या मुसळधार पावसाचे कारण ः
शुक्रवारी मुंबईत धुवांधार पाऊस झाला. ही पावसाची स्थिती मुंबई ते सिंधुदुर्ग जिह्यापर्यंत राज्यातही काही ठिकाणी सारखीच होती. या मुसळधार पावसाचे कारण म्हणजे 10 सप्टेंबरपासून पुढील आठवडाभर मान्सूनचा आस हा सगळ्यात खाली महाराष्ट्राला जवळ दक्षिणेकडे आला होता. पाऊस सर्वदूर होण्याचे कारण म्हणजे त्यादिवशी एकाहून अधिक प्रणाली तसेच पर्जन्यपुरक वातावरणीय स्थिती निर्माण झाली होती. गुजरातच्या पलीकडे पाकिस्तानच्या दक्षिणेकडे तसेच सिंधुदुर्ग जिह्याच्या समोर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. मान्सूनचा आस त्यावेळी दक्षिणेकडे होता. या वातावरणीय स्थितीची सुरुवात 10 सप्टेंबरपासून झाली होती. त्या दिवशी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आग्नेयकडून वायव्येकडे जात असताना पश्चिम मध्यप्रदेशासमोर आल्यानंतर खानदेश, मध्यप्रदेश, गुजरात भागात भरपूर पाऊस झाला. त्याची परिणती अरबी समुद्रात पाकिस्तानजवळ असलेल्या तीव्र वातावरणीय परिणामातून मुंबईतही पाऊस झाला. तसेच दक्षिण किनारपट्टीवरील केरळपर्यंत तटीय आस किंवा कमी दाबाचा खोल घळी (ऑफशोअर ट्रफ) तयार झाला होता. दोन्ही बाजूला दाब कमी होऊन खोलवर हा दाब एकाच ठिकाणी एकाकी दाबला जातो. या ठिकाणी ला-निनाचा प्रभाव देखील होता. ला-निना ही जागतिक प्रणाली असून अमेरिका
ऑस्टेलिया चीनचा समुद्र विषुववृत्त अशी पसरली आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून निर्माण होण्यास मुख्य स्त्राsत ला-निना आहे. ला-निनामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ओरिसा बंगालमध्ये पाऊस सुरु होऊन सातपुडा पर्वतराजींमध्ये पसरला. त्यातून महाराष्ट्रावरदेखील धुवांधार पाऊस झाला. तसेच कमी दाबाच्या पटय़ाच्या नैऋत्येला नेहमी जास्त पाऊस होत असल्याने त्या दिवशीच्या दाबाच्या नैऋत्येला नाशिक, इगतपुरी आणि मुंबईसह ठाणे या प्रदेशात धुवांधार पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारच्या मुसळधार पावसामागे एकाहून अधिक प्रणाली तसेच वातावरणीय स्थिती कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी मत मांडले. ज्या प्रदेशात पाऊस पडतो त्या प्रदेशासमोरच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण असावे असा एकमेव निकष नसून आजूबाजूच्या प्रदेशातील वातावरणीय स्थितीच्या एकत्रित परिणामातून पाऊस होउढ शकतो. शुक्रवार नंतरही असून नसून होणाऱया तुरळक सरी आणि मुसळधार सरींचा मिश्र पाऊस नोंदवला जात आहे. सूर्य दर्शन होत नाहीयं. मान्सून माघार घेण्याच्या स्थितीत असून 19 किंवा 20 तारखेपासून तशी वातावरणीय स्थिती निर्माण होऊ लागेल. दरम्यान मान्सूनचा मुक्काम लांबणार किंवा मान्सून परतीचा प्रवास उशिरा होणार अशा अंदाजातून चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो. आपले राज्य शेती प्रधान असून पावसाच्या विविध अंदाजांवर काळजी घेतली जाते. मात्र त्यासाठी संबंधित अंदाज करताना सांभाळून केले पाहिजेत. एवढेच नव्हे तर भारतीय हवामानशास्त्र विभागासोबत मान्सून साक्षर होण्याची गरज असल्याचेच अधिक स्पष्ट होताना दिसून येत आहे.
राम खांदारे