ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेल्या गोंधळानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला असून, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत.
नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत थोरातांची निष्क्रियता तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात त्यांना समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरात यांचं विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत होतं. त्यांचं पद जाणार असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, पक्षाच्या बैठकीआगोदरच त्यांनी आपला पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून, प्रभारी एच. के. पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते थोरांतांची समजूत काढणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, थोरात राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
अधिक वाचा : काँग्रेसमध्ये पटोलेंविरोधी सूर