शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करून सरकारच्या मुंबईतील 400 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका केली. काँक्रीटचे रस्ते पाणी शोषत नसल्याने अशा रस्त्यांच्या बांधकामामुळे मार्ग बदलू शकतात. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबईचे जोशीमठ होण्यास वेळ लागणार नसल्याचे त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “जगातील कोणतेही शहर संपूर्णपणे काँक्रीटच्या रस्त्यांनी व्यापलेले नाही. काँक्रीटचे रस्ते पावसाचे पाणी शोषत नाहीत. मुंबईत पूर आला तर त्याला जबाबदार कोण? उद्या मुंबईत जोशीमठसारखी परिस्थिती उद्भवली तर त्याला जबाबदार कोण? ?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मुंबईला काँक्रीट रस्त्यांची गरज नाही. पेडर रोड आणि मरीन ड्राईव्ह येथील रस्ते डांबरी आहेत. मी पक्षपातळीवर राजकिय नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी या घोटाळ्याविरोधात आवाज उठवावा. अन्यथा मुंबईला याची किंमत चुकवावी लागेल.” असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईतील 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला विरोध करताना आदित्य ठाकरे यांनी, राज्य सरकार बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) लूट करण्याच्या तयारीत आहे असाही आरोप केला. “ज्या वेळी लोकप्रतिनिधीच नसतात, अशा वेळी नागरी संस्था 6,000 कोटी रुपयांच्या निविदा कशा काय काढू शकतात?” असा सवाल ठाकरे यांनी केला.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता की, मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या निविदा ठेकेदारांच्या फायद्यासाठी जादा दराने काढण्यात आल्या होत्या. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्या असून, ज्या दराने निविदा काढण्यात आल्या, त्या दराने काम करण्यास कंपन्या इच्छुक नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता.
Next Article आजचे भविष्य मंगळवार दि. 17 जानेवारी 2023
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.