मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर काही मोठे आणि महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे सरकार आपले वाटत आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच मुंबईबाबत पंतप्रधानांना विशेष आपुलकी असल्याचेही ते म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार वाटत आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या सरकारच्या माध्यमातून ग्रामिण भागात कौतुकास्पद काम होत आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश होत आहे. तसेच मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार स्थापल्यानंतर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.” असही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्यादरम्यान काय चर्चा झाली या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “मुंबईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपुलकी आहे. मुंबईचा आणि महाराष्ट्राच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची प्रचिती दाओसमध्ये आली.” असेही ते म्हणाले.