ऑनलाईन टिम : मुंबई
अभिनेता किच्चा सुदीपच्या हिंदी यापुढे ‘राष्ट्रभाषा’ नसल्याच्या विधानावर अभिनेता अजय देवगणने वादाला तोंड फोडले. मनोज बाजपेयी, राम गोपाल वर्मा आणि हंसल मेहता यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपट निर्माते वादात सामील झाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक सोनू निगम यानेसुद्धा या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात सोनू निगम म्हणाले, की “घटनेत कुठेही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे लिहिले नाही. ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असू शकते, परंतु राष्ट्रीय भाषा नाही. खरे तर तमिळ ही सर्वात जुनी भाषा असून संस्कृत आणि तमिळ यांच्यात वाद आहे. बरीच लोक म्हणतात की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे.” निगम यांनी बोलताना असे निदर्शनास आणले की इतर राष्ट्रांबरोबर असलेले अनेक मुद्दे आहेत जी सोडवण्याची खरी गरज आहे त्यामुळे देशात नवीन समस्या सुरू करणे व्यर्थ आहे.