268 गाळय़ांची भाडेकराराची मुदत संपुष्टात : सुनावणीच्या निकालाची प्रतीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिकेच्या 268 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपुष्टात आल्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने लिलाव प्रक्रियेस ब्रेक लागला आहे. तर स्थानिक न्यायालयात 20 गाळेधारकांनी याचिका दाखल केली असून धारवाड उच्च न्यायालयात 7 याचिकांची सुनावणी सुरू आहे. सदर सुनावणी शुक्रवार दि. 24 रोजी होणार आहे.
लिलाव प्रक्रिया राबविण्यास आक्षेप घेऊन गाळेधारकांनी स्थगिती घेतली होती. त्यामुळे महापालिकेच्या लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला. भाडेकराराची मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना पूर्वसूचना न देता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे सांगून लिलाव प्रक्रियेस न्यायालयाकडून स्थगिती घेतली होती. त्यामुळे
दि. 6 ते 18 मे दरम्यान आयोजिलेल्या लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला होता.
स्थानिक न्यायालयात 20 गाळेधारकांनी धाव घेतली असून 7 गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारी होणार होती. सदर गाळेधारकांनी भाडय़ाची रक्कम मनपाकडे जमा केली नाही. तसेच गाळय़ांचा ताबा महापालिकेकडे असल्याने लिलाव प्रक्रियेला दिलेली स्थगिती हटविण्यासाठी महापालिकेच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार होता. पण ही सुनावणी शुक्रवार दि. 24 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी उच्च न्यायालयातील सुनावणी होण्याची शक्मयता आहे. या सुनावणीच्या निकालावर स्थानिक न्यायालयातील याचिकांचे भवितव्य अवलंबून आहे. सुनावणीचा निकाल लागल्यानंतर लिलाव प्रक्रियेचे काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे सुनावणीच्या निकालाची प्रतीक्षा गाळेधारक आणि मनपाला आहे.