वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा सलामीचा फलंदाज मुरली विजयने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय योग्य वेळी घेतल्याचे मुरली विजयने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या मुरली विजयने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मुरली विजयने आपली शेवटची कसोटी 2018 च्या डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विऊद्ध पर्थ येथे खेळली होती. मुरली विजयने आपले कसोटी पर्दापण ऑस्ट्रेलिया विऊद्ध 2008-09 साली नागपूरमध्ये केले होते. भारतीय संघामध्ये गौतम गंभीरच्या जागी मुरली विजयला नागपूरच्या कसोटीत बदली खेळाडू म्हणून संधी दिली होती. मुरली विजयने तामिळनाडू संघाचे प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए प्रकारात प्रतिनिधीत्व केले. त्याने तामिळनाडूतर्फे 2019 साली आपला शेवटचा सामना खेळला होता. 2020 च्या आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळला होता.
मुरली विजयने 61 कसोटी सामन्यात 38.28 धावांच्या सरासरीने 3982 धावा जमविल्या असुन त्यामध्ये 12 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 167 ही मुरली विजयची कसोटीमधील सर्वोत्तम खेळी आहे. मुरली विजयने 17 वनडे सामन्यात 339 धावा तर सात टी-20 सामन्यात त्याने 169 धावा जमविल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत खेळताना त्याने एकूण 458 धावा झळकविल्या असून त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.