ऑनलाईन टीम/तरुण भारत
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujarat)हलवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापलं असून विरोधकांकडून सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच, “महाविकास आघाडीने महाराष्ट्राला खाली आणले”, असा आरोपही केला. (MVA government brought down Maharashtra dcm devendra fadnavis allegations)
” गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा मोठा आहे. मात्र आपल्याकडे रिफायनरीलाच विरोध करण्यात आला. फॉक्सकॉनच्या अग्रवाल यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देतो असे त्यांना सांगितले, पण तोपर्यंत त्यांचा गुजरातसोबत करार झाला होता. आमचे सरकार येण्याआधी तो करार झाला होता. परंतु, यावरून आता काही जण बोलत आहेत, बोलणाऱ्यांनी आपले कर्तृत्व सांगावे, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्याला गुजरातच्या मागे नेले. पण आम्ही राज्याला पुन्हा एक नंबरवर आणू, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुंबईत आज लघु उद्योग भारती प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात महाराष्ट्राला गुरजातच्या मागे नेले. परंतु, आता आम्ही पुन्हा राज्याला पहिल्या नंबरवर घेऊन जाऊ. अनेकदा गुजरातची चर्चा होते, अलीकडे तर जास्तच होते. आपण चौथ्या क्रमाकांवर आहोत. परंतु २०१७ ला आपण पहिल्या क्रमांकावर होतो. दुर्दैवाने आपण दोन वर्षात मागे गेलो. आता जे बोलत आहेत त्यांनी गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेले. पण मी माझ्या काळात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेलं होतं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. “आपल्याकडे रिफायनरी येणार होती. त्यातून 3 लाख 50 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. ५ लाख रोजगार येणार होते. रिफानरी तयार झाली असती तर राज्य १० वर्ष पुढे गेले असते. पण त्याला विरोध झाला. मोठी गुंतवणूक आपण घालवली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलाय.
तसेच मुंबई-नागपुर एक्स्प्रेस वे म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ‘मात्र, त्यावेळी आम्ही सगळ्या विरोधकांवर मात करत मुंबई-नागपुर एक्स्प्रेस वेचे काम मार्गी लावले’, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.