ऑनलाईन टीम / तरुण भारत :
NA टॅक्स हटविण्याचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीदारांना खरेदीवेळी एकदाच NA टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर हा टॅक्स भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
विखे-पाटील म्हणाले, दरवर्षी NA करणे हे क्लिष्ट असते. लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे आता खरेदीच्या वेळी एकदाच NA भरावा लागेल असा निर्णय सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या महसूलावर परिणाम होईल, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना याचा फायदा देता येईल.
अधिक वाचा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; उष्माघाताने 11 श्री सदस्यांचा मृत्यू
तसेच भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते आता 15 दिवसांत घरपोच देण्यात येतील. मालमत्तांचेही आता डिजिटल मॅपिंग करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांना ड्रोन पुरवता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.