सैन्याने ‘एसओपी’ पाळली नसल्याचा ठपका
ऑनलाईन टिम / कोहीमा
डिसेंबर 2021 मध्ये नागालँडच्या मोन जिल्ह्यात सुरक्षा सक्षकांच्या हल्ल्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एक अधिकारी आणि 29 सैनिकांसह – तीस भारतीय लष्करी जवानांवर आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत.
“मानक कार्यप्रणाली आणि प्रतिबद्धता नियमांचे पालन न केल्याचा” आरोप ठेऊन 21 पॅरा SF च्या कर्मचार्यांवर ही कारवाई करण्यात आली. या सैनिकांवर “अंदाधुंद आणि विषम गोळीबार” करण्याचा आरोप आहे. नागालँडचे डीजीपी टी.जॉन. लॉन्गकुमर यांनी कोहिमा येथे पत्रकार परिषदेत बोलताना याची माहीती सांगितली.
नागालँडच्या ओटिंग गावात 4 डिसेंबर 2021 रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका पिकअप ट्रकवर अंधाधून गोळीबार केला होता. यात वाहनामधील 8 खाण कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे गंभिर जखमी झाले होते. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी सात नागरिक आणि एक सुरक्षा कर्मचारी यांचा मृत्यू झाला.
या सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 120 (बी) (गुन्हेगारी कट), 201 (पुरावा नष्ट करणे) यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.