मर्यादा राखून बोलणं गरजेचं, नाना पटोले
राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. काॅंग्रेसच्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी आहेत. त्यामुळे राज्या-राज्यातील काॅंग्रेस नेत्यांची सोडचिट्टी देत आहेत. काॅंग्रेसला गळती लागली आहे. काॅंग्रेसची (Congress)अवस्था फाटलेल्या आभाळासारखी आहे अशी टीका ‘सामना’तून ( Saamana) आज करण्यात आली आहे. याला काॅंग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, मी सामना वाचत नाही हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. बेरोजगारी, महागाईच्या मुद्य़ावर अग्रलेख लिहण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे विचार नाहीत त्यांच्याबद्दल मला बोलायच नाही असेही ते म्हणाले. काॅंग्रेस एक विचार आहे. त्य़ाने देशाला महासत्ता बनवण्यासाठी झोकून दिलं आहे. राजीव गांधीही (Rajiv Gandhi)देशासाठी बलिदान दिलं आहे. ज्य़ांना बलिदान कळतं नाही त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही असा टोला त्यांनी लगावला.
देशातील ४५ कोटी तरूणांनी नोकरीची आस सोडली आहे. अडीच कोटी नोकऱ्या लॅप्स करून टाकल्या, रोज देशाच्या प्राॅपर्टी विकल्या जात आहेत त्याच्यावर अग्रलेख लिहण्याची गरज आहे असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला.
मविआमध्ये काॅंग्रेसविरोधात कुरघोडी सुरु
पुढे ते म्हणाले, आमच्या मित्रपक्षाकडून भाजपला ताकद देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सेनेने मर्यादा राखून बोलणं गरजेचं आहे. मी सामना वाचत नसल्याने त्यांनी काय लिहलं आहे मला माहित नाही. त्यामुळे योग्य वेळ आली की उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला. मविआमध्ये काॅंग्रेसविरोधात कुरघोडी सुरु आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री य़ांनी लक्ष घालाव अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
काॅंग्रेस एक विचार
काॅंग्रेस एक विचार आहे. तो जनतेच्या मनामध्ये आहे. २०२४ मध्ये तो एक मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असेही ते म्हणाले. गिधाडाच्य़ा शापाने ढोर मरत नाही अस म्हणत टोला लगावला. विकासनिधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.