प्रतिनिधी/सातारा
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
यंदाचे स्वातंत्र्यदिन हा आणखिनच महत्वाचा आहे, कारण यंदा आपल्या स्वातंत्र्योत्सवाला 75 वर्ष पुर्ण झाले आहे. त्यामुळे ‘आजादी का अमृत महोत्सव’ यंदा आपण साजरा करत आहोत. त्यामुळे या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन शासनातर्फे ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. शासनातर्फे राबविण्यात येणारा हा निर्णय जरी स्तुत्य असला तरी राष्ट्रध्वजाचा मान राखला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित रहात आहे.
‘हर घर तिरंगा’ या संकल्पने अंतर्गत दि. 11 ते 17 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकांनी आपपल्या निवासस्थावर तिरंगा ध्वज फडकवून अनोख्या पध्दतीने यंदाचे हे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याची संकल्पना आखण्यात आली आहे. ध्वज फडकविण्याचा निर्णय हा प्रत्येकाचा एच्छिक आहे, असे जरी असले तरी भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. याचेही तितक्याच काटेकोर पणे पालण होणे गरजेचे आहे.
तसेच भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढय़ाच्या स्मृती जागृत रहाव्यात, या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात क्रांतीकारकांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी. कालावधीत प्रत्येकांच्या घरावर, शासकीय कार्यालयांवर तिरंगा झंडा फडकेल, या हर घर झंडा उपक्रमात जिह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
अभियाना करिता लागु करण्यात आलेले नियम प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे,
झेंडाचा आकार आयताकार असावा, झेंडय़ाची लांबी, रूंदी 3 ते 3 असावी तिरंगा ध्वज बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पोलिस्टर, सिल्क कापडा पासून बनविलेला असावा, हा ध्वज फडकविताना केशरी रंग वरच्या बाजुला असावा. ध्वज उतरविताना काळजीपुर्वक व सन्मानाने उतरवावा. ‘हर घर झेंडा’ अभियान कालावधी नंतर प्रत्येकानी ध्वज अगदी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे झुकलेला, फाटलेला, कापलेला, मळलेला झेंडा कोणत्याही परिस्थितीत लावू नये.
इतके ध्वज उपलब्ध होतील का?
सर्व जाती धर्मातील नागरिकांना आपल्या तिरंग्या बाबत अभिमान आहे, त्यामुळे अनेकजण स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होतील. पण इतक्या प्रमाणातील ध्वज बाजारपेठेत उपलब्ध होतील का? तसेच त्याची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी असली पाहिजे. जेणे करून प्रत्येकालाच या उपक्रमात सहभाग घेता येईल.
वर्षभर जपवणुक महत्वाची
ध्वज संहितेचे मान राखने हे ही तितकेच महत्वाचे आहे, कारण हा उपक्रम सलग 7 दिवसाचा आहे. त्यातच ध्वज हा तितक्याच मानाने दररोज सुर्यास्ता दरम्यान उतरवुन त्याची व्यवस्तीत घडी घालावयाची असते, जेने करून तो चुरगाळु नये. तसेच या उपक्रमा नंतर त्या ध्वजाची जपवणुक ही तितक्याच काटेकोर पणे करणे गरजेचे आहे.
यंदा ही नेहमी इतकेच ध्वज मागविणार
शासनातर्फे यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासंबंधी आम्हाला यंदा अधिक ध्वज बनवा असे काही सांगण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही प्रतिवर्षी प्रमाणे यंदा ही 30 ते 40 ध्वजच मागविणार आहोत. आमच्या ईथे 2/3चा ध्वज हा 800 ते 850 रूपये दराने विक्रीस ठेवण्यात येतो. ध्वजा बाबत काही संहिता असुन त्याचे पालन होणे ही तितकेच गरजेचे आहे.
विक्रम गोरे
खादी ग्रामेद्यागे वस्तु भांडारा, सातारा