2 डिसेंबर 1984 च्या रात्री युनियन कार्बाइड कारखान्यात मिथाइल आयसो सायनाइड (MIC)ची गळती झाली होती. हा विषारी वायू हवेत मिसळल्याने तो दूरवर पसरला होता. या गॅस गळतीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. जगभरात प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. प्रदुषणाचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. हवेतील प्रदूषणाचा हृदय, मेंदू आणि फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. तसेच कॅन्सरसारख्या आजारांनाही प्रदुषण कारणीभूत ठरत आहेत. प्रदूषण रोखण्यास मदत करणाऱ्या कायद्यांची जाणीव लोकांना करून देणे, औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण याबाबत जागरूकता आणि औद्योगिक प्रक्रिया आणि मानवी निष्काळजीपणामुळे होणारे प्रदूषण रोखणे हे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करण्याचे उद्देश आहेत.
Trending
- विंडीज महिला संघाची विजयी सलामी
- वेतवडेतील आदर्श शाळा बांधकामाची होणार चौकशी!सीईओंकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत; ‘तरुण भारत संवाद’च्या वृत्ताची गंभीर दखल
- सरवडेतील बालकाचा नाधवडे येथे कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
- धरण उशाला…तहान घशाला ! राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील ओलवण ग्रामस्थांची अवस्था
- चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…महाविकास आघाडीचं प्रचंड शक्तीप्रदर्शन
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !