36 हजार कि.मी. सायकलवरून प्रवास : 30 लाख विद्यार्थ्यांचे प्रबोधन
प्रतिनिधी /बेळगाव
प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जागृती करण्यासाठी मध्यप्रदेशमधील एका सायकलपटूने सायकलवरून देश पर्यटनाचा उपक्रम हाती घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी हा युवक बेळगावला आला होता. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना भेटी देऊन त्याने सेंद्रिय शेती व सिंगल युज प्लास्टिक फ्री इंडियासंबंधी मार्गदर्शन केले.
प्रदूषणमुक्त भारत, भटक्मया जनावरांना चारा देणे, त्यांना मदत करणे आदी उद्देशांसाठी आपली सायकल यात्रा सुरू आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी गुजरातमधील गांधीनगरमधून आपण सायकल यात्रेला सुऊवात केली. आतापर्यंत 36 हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण झाली असून गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवाहून आता कर्नाटकात आपली यात्रा सुरू असल्याचे ब्रजेशने सांगितले.
सायकल यात्रेदरम्यान सुमारे 30 लाख शाळकरी मुलांमध्ये सिंगल युज प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जागृती केली आहे. 1 जुलैपासून देशात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका आहे. जनावरे, जमीन, समुद्र, नदी-नाले आदींसाठीही ते हानिकारक आहे. यासंबंधी जागृती करणे व सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी सरकारवर दबाव पडावा यासाठी आपली सायकल यात्रा असल्याचेही ब्रजेशने सांगितले.
देशातील छोट्या छोट्या गावांना भेटी देऊन सेंद्रिय शेतीबद्दल जागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत 7 हजार 500 गावांना आपण भेट दिली आहे. 9 लाख शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली आहे, असेही या युवकाने सांगितले. 32 वषीय ब्रजेश यांची सेनादलात नियुक्ती झाली होती. प्रशिक्षणाच्या वेळी पायाला इजा पोहोचली. आणखी 5 ते 6 वर्षे ही सायकल यात्रा सुरू राहणार आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण महाराष्ट्रातील एका आदिवासी पाड्यात होतो. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळी नाशिकच्या एका खेड्यात होतो. त्यामुळे सायकल यात्रेला विलंब झाल्याचे या युवकाने सांगितले.