म्हादईप्रश्नी निर्मला सावंत यांचे मत
प्रतिनिधी / पणजी
म्हादई पाणीप्रश्नी नैसर्गिक न्यायाचा विजय झाला पाहिजे अन्यथा निसर्ग आम्हाला क्षमा करणार नाही, असे मत म्हादई बचाव अभियानच्या निमंत्रक निर्मला सावंत यांनी व्यक्त केले आहे.
या प्रश्नी तात्काळ सुनावणीसाठी अपील करणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे किमान आता तरी त्यांनी जनजागृतीसाठी जनजागृतीसाठी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी म्हणून जनजागरण आंदोलन शांत केले पाहिजे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे जे घडत आहे त्याची पुनरावृत्ती गोव्यात तसेच शेजारील राज्यांमध्ये होऊ नये. त्यामुळे दुसऱया खोऱयातील पाणी वळवण्याबाबत पुनर्विचार झाला पाहिजे. त्यासाठी वैज्ञानिक निरीक्षणे आणि परीक्षणाची गरज आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.