ऑनलाईन टीम/तरुण भारत
मरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली या सभेवर खासदार राणा यांनी जहरी टीका केली आहे. लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, असं म्हणत राणा यांनी टीका केली आहे. शेतकरी, वीज तुटवडा यावर कोणतेही भाष्य केले नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री एकातरी शेतकऱ्याच्या घरी गेले का, असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेनेची काल मुंबईत आयोजित सभा म्हणजे लाचर मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती अशा शब्दात अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि लोडशेडिंगबद्दल एक शब्दही उच्चारला नाही, फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. आज त्या दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दरम्यान, औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहिली त्यावर मुख्यमंत्री ठाकरे एक शब्द बोलले नाहीत. त्यामुळे शिवसेना औरंगजेब सेना बनलीय का ? जर बाळासाहेब ठाकरे असते तर औरंगजेबच्या कबरीचे ज्याने फुले वाहिली त्याला त्याच कबरीत गाडले असते. विचारधारा नुसार आपल्या देवाला विसरले. मुन्नाभाई फिल्म सुपरहीट होती. तुम्ही फ्लॅाप होणार. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सह्योगी पक्षांनी अटी घातल्या होत्या. शिवभोजन थाली भ्रष्टाचाराचा अड्डा बनलीय. मोदीजींचे फोटो लावून मते मागितली. काश्मिरी पंडीतांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. हे कलम हटवले जावे ही बाळासाहेबांची इच्छा होती… ती इच्छा मोदींनी पूर्ण केली. जेंव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नसतील. सत्तेत नसतील तेंव्हा रश्मी ठाकरे यांना जेलमध्ये टाकल्यावर मी विचारेन की पीडा कशी असते? बीकेसी मैदानात हनुमान चालिसा पठन करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा अवमान केला, अशी टीका राणा यांनी केली.
एका खासदाराने मुख्यमंत्र्यांच्या हातात गदा देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी त्याला हात न लावता ते मागे फिरले. गदा कोणी दिली तर त्याला हातात घेऊन त्यानंतर गदा दुसऱ्याकडे दिली जाते. पण मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेऊन हनुमानाचा अपमान केलाय. असा आरोपही नवनीत राणा यांनी केला आहे.