कोल्हापूर-उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने धर्मांध शक्तीला बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या पुरोगामी विचारांना साथ दिली. हुशार आणि राष्ट्रप्रेमी शाहूनगरीने राज्यासह देशात एक वेगळा संदेश पोहोचवला आहे. त्यांच्या निकालाने माजी काळजी वाढवली आहे. कोल्हापूरकर लय हुशार आहेत. त्यांनी भाजपचा करेक्ट बंदोबस्त करून महाराष्ट्र जनतेला विचार दिला आहे. असे गौरोउद्गार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काढले. ते तपोवन मैदान येथे झालेल्या संकल्प सभेत बोलत होते.
…. ईडी, सीबीआयचा गैरवापर
सत्ता येते आणि जातेही. पण नेहमी जमीनीवर पाय हवे. सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नयें. पण अलिकडच्या काळात ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून विरोधकांना दमदाटी केली जात आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचे तोंड आणि काम बंद केले जात असेल तर राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता योग्य वेळी त्यांचा खरपूस समाचार घेतील असा इशारा पवार यांनी दिला.
….प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कौतूक
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन परिवार संवाद दौरा करून कार्यकर्त्यांबरोबरच जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याबद्दल पवार यांनी पाटील यांचे संकल्प सभेत कौतूक केले.
….. चंद्रकांत पाटील हिमालयात कधी जाणार ?
संकल्प सभेत बोलताना पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. पवार म्हणाले, कोल्हापुरच्या निकालानंतर माझी काळजी वाढली. कारण चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातील पराभवानंतर हिमालयात जाणार असल्याची घोषणा केली होती. पाटील हे शब्दाचे पक्के आहेत, असे ऐकले होते. त्यामुळे आता ते शब्दाला जागून हिमालयात जाणार काय ? अशी कोपरखळी पवार यांनी लगावली.